माझा वाघ हरपला ; माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
भिलवडी येथे काँग्रेस पक्षाचे नेते संग्राम दादा पाटील यांना अभिवादन ; अंत्यविधीसाठी जनसागर लोटला
भिलवडी: भिलवडी गावाच्या विकासासाठी नेहमीच माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांचा पुढाकार असत होता. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आज माझा वाघ हरपला, याच मला फार दुःख झाले आहे,
असे भावनात्मक उद्गार माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
ते भिलवडी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संग्राम दादा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी कार्यक्रमास उपस्थित होते.दरम्यान, खासदार विशाल दादा पाटील यांनी संग्राम दादा पाटील यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेतील आणि संपूर्ण गावातील दुकाने, कारभार व्यापारी आणि ग्रामस्थांनी बंद ठेवला.
बुधवारी सकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, मानसिंग को- ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक लोकनेते जे के बापू जाधव, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, भारती बँकेचे संचालक जितेश भैय्या कदम, सागर कदम, साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश भैय्या लाड, चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे, उद्योजक सतीश आबा पाटील, माजी सरपंच शहाजी भाऊ गुरव, खटावचे सरपंच ओंकार पाटील, चोपडेवाडीचे सरपंच यादव, भिलवडी परिसरातील आणि विविध क्षेत्रांमधील पदाधिकारी, पत्रकार बांधव, मान्यवर उपस्थित होते.