माझा वाघ हरपला ; माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
भिलवडी: भिलवडी गावाच्या विकासासाठी नेहमीच माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांचा पुढाकार असत होता. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आज माझा वाघ हरपला, याच मला फार दुःख झाले आहे,
असे भावनात्मक उद्गार माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
ते भिलवडी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संग्राम दादा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी कार्यक्रमास उपस्थित होते.दरम्यान, खासदार विशाल दादा पाटील यांनी संग्राम दादा पाटील यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेतील आणि संपूर्ण गावातील दुकाने, कारभार व्यापारी आणि ग्रामस्थांनी बंद ठेवला. सकाळी गावातील मूख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भिलवडी परिसरातील आणि विविध क्षेत्रांमधील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.