महाराष्ट्रक्राईम

भिलवडी अन् परिसरात चोर काही सापडेना ; भीती काही मोडेना

नागरिकांनी काळजी घ्या, पुन्हा पोलिसांचे आव्हान : ग्रामसुरक्षा दलाच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष

 

भिलवडी ;  सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी प्रकार घडत आहेत आणि झाल्या ही आहेत.बंदोबस्त आणि इतर काही घटना पाहिल्या तर चोर आणि पोलिस खेळ चालण्याचे चित्र दिसून येत आहे. भिलवडी अन् परिसरात चोर काही सापडेना ; भीती काही मोडेना, नागरिकांनी काळजी घ्या, पुन्हा पोलिसांचे आव्हान, हे बरोबर आहे आम्ही सहकार्य करू पण ठोस भूमिका  कधी घेणार, अशा प्रतिक्रिया लोकांतून येत आहेत. 

भिलवडी पोलिस ठाण्याचे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रोज कुठे ना कुठे तरी चोरांची टोळी सक्रिय होऊन हूलकावणी देत आहेत. पोलिस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरूण, ज्येष्ठ नागरिक रात्रीच्या गस्ती घालतं आहेत. तर महिलाही झोप न घेता रात्री जागरण करीत आहेत. हे का तर भीती पोटीच ना. अशा रात्री जागून सकाळी कामे कशी करायची. कुठे पर्यंत आम्ही भीती पोटीं जगायचं हा सवाल लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

काल परवा सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी बैठक घेतली लोकांना आधार दिला पण त्या नुसार काही होत आहे का?  फक्त भिलवडी पोलिस ठाण्यावर सर्वच जबाबदारी टाकने योग्य आहे का?  नाही तर सांगली जिल्हा पोलिस दलातील जादा पोलिस कुमक मागवला पाहिजे. नाही तर एखादी कंमाडोची टीम, सैनिक दल बोलावला पाहिजे. यामुळे दिवसाढवळ्या  आणि  रात्री  चोरी करणाऱ्या चोरट्यांना  आळा बसेल, असेही लोकांमधून बोल़़ले जात आहे. 

सांगलीचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिस ठाण्याकडून चोरीचा छडा लागण्याचा चांगला प्रयत्न सुरू आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने आम्ही लोकही तितकाच प्रयत्न करू, पण चोरीची भीती आमच्या मनातून जात नाही , अशा भावना व्यापारी वर्ग आणि नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!