कृषी व व्यापारमहाराष्ट्र

कुंडल येथे शंखी गोगलगाय नियंत्रण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉक्टर सचिन महाजन, शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज यांचे मोलाचे मार्गदर्शन

 

 

पलूस: महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय पलूस यांच्यामार्फत मौजे कुंडल येथे शंखी गोगलगाय नियंत्रण व आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र संपन्न झाले.या कार्यक्रमात डॉक्टर सचिन महाजन शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज यांनी शंकी गोगलगाय नियंत्रण याबाबत पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत गोगलगाय सोयाबीन भाजीपाला पपई केळी ऊस रोपटकेतील रोपे नवीन पाने फुले कंद यांना छिद्र करतात तसेच बियांपासून अंकुरित कोवळे कोंब यांना कुरतडून खातात यामुळे उपद्रव होऊन कुर्तडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन लहान रोपे मरतात.
शंखी गोगलगाय आफ्रिकन जायंट स्नेल या नावाने परिचित असून ती निरनिराळ्या पाचशे वनस्पतींना खाऊन जगते ही कीड दिवसा दगड पालापाचोल्याळ्याच्या खाली झाडाच्या खोडाभोवती दाट गवतात इत्यादी ठिकाणी लपते व रात्रीच्या वेळी सक्रिय होऊन पिकाचे नुकसान करते.
जीवनक्रम
पूर्ण वाढ झालेल्या शंखी गोगलगाय ची लांबी पंधरा ते साडे सतरा सेंटीमीटर असते अंडी गोलाकृती व पांढऱ्या रंगाची शाबुदाण्यासारखी असतात सर्व गोलगाय बहुलिंगी असून त्या अंडी देण्यास सक्षम असतात. एक गोगलगाय सरासरी शंभर ते दीडशे अंडी देते. एक मादी वर्षातून सहा वेळा अंडी देते. सर्वसाधारण 17 दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात त्याची वाढ होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. शंखि गोगलगाय अति थंड किंवा अति उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुदऱ्याने बंद करून सुप्तावस्थेत जातात.
प्रसार –
या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, यंत्रसामग्री, शेणखत, वाळू, विटा, बेणे, रोपे, कलमे, इत्यादी मार्फत होतो गोगलगाय सर्वसाधारणपणे अन्न पाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात.
*गोगलगाय नियंत्रण उपायोजना*
सामूहिक मशागतीचे नियंत्रण
१) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी
२) अंडी गोळा करून नष्ट करावीत
३) शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत
४) शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख मोरचूद व चुना यांचे मिश्रण पसरवावे
५) शेतात सात ते दहा मीटर वर वाळलेले गवत, पपईचा पाला, गोणपाट इत्यादी ढीग ठेवावेत.
६) सकाळी गोगलगायी या ढगाखाली आश्रय घेतात. त्या गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
७) फळबागेतील उपद्रव टाळण्यासाठी दहा टक्के बोर्डपेस्ट बुंध्याला लावावी.
जैविक उपाय
गोगल गाईच्या नैसर्गिक शेतीचे संवर्धन करावे उदाहरणार्थ कोंबडी बदक
रासायनिक उपाय
दोन किलो मेल्ट प्रती एकर दहा लिटर पाणी अधिक दोन किलो गूळ अधिक 50 किलो गव्हाचे काड र्किंवा पोहे दहा ते बारा तास भिजत घालून शेतात छोटे छोटे ठीग करून ठेवल्यास प्रभावी नियंत्रण करता येते. अशाप्रकारे उपाययोजना कराव्यात असे आवाहन श्री महाजन यांनी केले.
त्यानंतर क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री विलास जाधव यांनी आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी पर्यवेक्षक गीतांजली रकटे मॅडम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी श्री एस बी पटकुरे मंडळ कृषी अधिकारी श्री एस टी खारगे कृषी सहाय्यक आकाश शेटे आत्मा योजनेचे प्रशांत पाटील कुंडल ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्जुन कुंभार सदस्य हनुमंत परळे किरण लाड व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य किरण लाड यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!