महाराष्ट्र

काळजी करायचे कारण नाही ; मी आपल्याच सोबत ; माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम

भिलवडीतील पूरग्रस्त नागरिकांची, स्थलांतरित लोकांची विचारपूस ; लोकांमध्ये समाधान अन् उत्साह

 

भिलवडी :

काळजी करायचे कारण नाही ; मी आपल्याच सोबत आहे ; असे सांगून माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी भिलवडी येथील पुरपट्ट्यातील नागरिकांना दिलासा दिला. तसेच पूरग्रस्त नागरिकांची, स्थलांतरित लोकांची विचारपूस केली. यामुळे लोकांमध्ये समाधान आणि उत्साह दिसत आहे.

नेहमीच माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम पलूस तालुक्यातील पूर पट्टीतील गावे आणि भिलवडी येथील पूरग्रस्त नागरिकांची पडत्या काळात मदत करतात. शनिवार दिनांक 27 रोजी डॉक्टर विश्वजीत कदम यांनी भिलवडी(मौलानानगर) येथील स्थलांतरित केलेल्या कुटुंबातील लोकांची भिलवडी सेकंडरी स्कुल येथे भेट घेतली. तसेच साखरवाडी, साठेनगर, आणि पंचशीलनगर  येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत, तशा सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. आपत्तीच्या या कठीण काळात त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे वचन देतो. आपण सर्व मिळून ह्या परिस्थितीला सामोरे जाऊया आणि एकमेकांना मदतीचा हात देऊया, असे ही आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले.

आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पडत्या काळात आपल्याला मदतीचे आश्वासन दिल्याने पूरग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे.

या भेटीमध्ये प्रशासकीय अधिकारी, भिलवडीचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!