प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्या : संग्राम कणसे .
पलूस :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2024 अंतर्गत खरीप पिकांचा एक रुपयात विमा भरण्याचे काम सुरू असून या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे आदी सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात पीकविमा भरण्याची अंतिम दिनांक 15 जुलै आहे अशी माहिती पलूस तालुका भारतीय कृषी विमा कंपनी प्रतिनिधी संग्राम कणसे यांनी दिली.
कणसे यावेळी म्हणाले विमा संरक्षित बाबी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन , विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास , ढगफुटी , वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग ) व काढणीपश्चात नुकसान , चक्रीवादळामुळे झालेले नुकसान बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत अधीसूचित पिकांच्या नुकसानाची पूर्वसूचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत कृषी रक्षक संकेतस्थळावर सहाय्यता क्रमांक 14447 तसेच CROP INSURANCE APP द्वारे तक्रार नोंदवू शकतात तरी पलूस तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरावा , असे आवाहन भारतीय कृषी विमा कंपनी प्रतिनिधी संग्राम कणसे यांनी केले आहे.