किर्लोस्करवाडी येथील पालकांनी केला रास्ता रोको : शाळा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिला पालक संतप्त
पलूस: सध्याचे परिसरात असणारे गढूळ वातावरण लक्षात घेता दक्षता घेण्याकरिता पालकांनी मुलांना कारखान्याच्या पहिल्या गेट पर्यंत सोडून
जाण्याकरिता कंपनी आणि किर्लोस्कर विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापनाने भाग पाडले.
गुरुवार पासून हा नियम अमलात आणल्यामुळे पालकांमध्ये चीड निर्माण झाली होती. आज शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास कंपनीच्या गेट जवळ पालकानी काही काळ रास्ता रोको केला. त्यावेळी कंपनी व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापनाचे शिक्षक तिथे आले. त्यावेळी पालकांच्यात आणि व्यवस्थापनामध्ये शाब्दिक चकमकही उडाली.
किर्लोस्कर कारखान्याचे अधिकारी सिंगसाहेब मुख्याध्यापक मिठारी सर, केंद्रप्रमुख किरण आमणे, यू बी कुलकर्णी ,अभय बिराज यांच्या सोबत झालेल्या चर्चेत सावंतपुरचे सरपंच प्रल्हाद जाधव, राजू सावंत, अशोक जाधव पालकांनी पुढाकार घेतला. शाळा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार असून त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी, गणवेश पुस्तके वाटप वाटण्यात आले नाही. शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सोडावयाची परवानगी पालकांना मिळावी असेही यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने दोन दिवसात मिटींगचे आयोजन करून यावरती योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले. मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा निर्णय घेतला होता. असेही सिंग म्हणाले. ज्यावेळी पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल व मुख्याध्यापका बद्दल नाराजी व्यक्त केली. महिला पालकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.