गोकुळ दूध संघाच्यावतीने जनावरांचा भाकङ काळ कमी करण्यासाठी जनावरांचे वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन : चेअरमन अरूणकुमार ङोंगळे यांची माहिती
कोल्हापूरहून””दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील :-
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ ) मार्फत प्रायोगिक तत्वावर जिल्हातील गोकुळ संलग्न 11 पशुसंवर्धन रूटवर जनावरांचे वंध्यत्व निवारण शिबिराचा प्रारंभ राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली येथे गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला .
यावेळी बोलताना चेअरमन अरुणकूमार डोंगळे म्हणाले की “” सध्या दुग्ध व्यवसायामध्ये दूध उत्पादकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जनावरांचा भाकड काळ, संघ कार्यक्षेत्रात एकुण जनावरांच्या ३० टक्के जनावरे गाभण व दूधातही नाहीत अशी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्याला आर्थिकदॄष्टया परवडणारे नाही. आज प्रत्येक गावातून जनावरे कत्तलखाणन्यात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. जर ही जनावरे दुधात आणली तर ते प्रमाण कमी होऊ शकते. तसेच संघाचे दूध संकलन वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी जनावरांचे वंध्यत्व निवारण कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे फार महत्वाचे आहे.या शिबिरामुळे जास्तीत जास्त जनावरांच्या गाभण तक्रारींचे निरसन होण्यास मदत होईल,त्यामुळे पर्यायाने दोन वेतातील अंतर कमी होऊन जातिवंत वासरे जन्मास येण्यास मदत होणार आहे . असे सांगून ते पुढे बोलताना म्हणाले कि” संघाकडून देण्यात येणा-या संघ सेवा-सुविधा मध्ये पशुवैद्यकीय सेवा ही अतिशय महत्वाची सेवा असून जिल्हातील गोकुळ सलग्न प्रत्येक गावामध्ये दूध वाढीसाठी व जनावराचा भाकड काळ कमी करण्यासाठी संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वंध्यत्व निवारण शिबिराचे नियोजन केले जाणार असून त्यामध्ये जनावरांवर औषध उपचार केले जाणार आहेत.जिल्हयातील गोकुळ संलग्न दूध उत्पादकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन ही चेअरमन अरूणकूमार डोंगळे यांनी केले .
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे, संचालक “”, भोगावतीचे संचालक हिंदुराव चौगुले, “”भोगावती माजी संचालक विश्वासराव पाटील,”” गौतम कांबळे,”” राजेंद्र पाटील राजेंद्र यादव,”” पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.गोसावी,संकलन सुपरवायझर राजेंद्र खोत ,”” शिवाजी डोंगळे “”आदीसह पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टर,अधिकारी व कर्मचारी व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.