महाराष्ट्रसामाजिक

भिलवडी जायंट्सचे काम उत्तम : माजी खासदार राजू शेट्टी

भिलवडी जायंट्स ग्रुपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभ उत्साहात :नूतन अध्यक्ष बाहुबली चौगुले यांची निवड

 

दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी-:  भिलवडी जायंट्सचे काम उत्तम आहे. समाजाचे काम करत राहिलो तर समाधान वेगळेच असते. इतरांसाठी जगण्यातला आनंद वेगळाच असतो, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
भिलवडी जायंट्स ग्रुपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते.

दिग्गज विशेष समिती सदस्य गिरीश चितळे, मकरंद चितळे, सुनीता चितळे, भक्ती चितळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव संदीप राजोबा, केंद्रीय समिती सदस्य सतीश बापट, ॲड. विलासराव पवार, साधना मालगावे, अनुजा पाटील, प्रशांत माळी, सुहास खोत, डी.सी.पाटील, सुबोध वाळवेकर, महावीर चौगुले, सुनील परीट उपस्थित होते. प्रस्तावना लेखक सुभाष कवाडे यांनी केली.

राजू शेट्टी म्हणाले, भिलवडीतील जायंट्स ग्रुपचे काम संस्थापक नाना चुडासामा आणि काकासाहेब चितळे यांनी घालून दिलेल्या मार्गावर सतत सुरू आहे. हा गट कार्यक्षम आणि सक्रिय आहे. या गटाने मृत्यूनंतर २०६ नेत्रदान केले आहेत. यामुळे ४१२ जणांना दृष्टी मिळाली. हे एक महान पुण्यपूर्ण काम आहे. रक्तदान, आरोग्य तपासणीसह इतर सामाजिक कार्यात भिलवडी जायंट्सचे काम उत्तम आहे. गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जायंट्सचे सर्व सदस्य आणित्यांचे कुटुंब चांगले योगदान देत आहेत.

संदीप राजोबा म्हणाले, समाजाचे आणि दिग्गजांचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने बुद्धिजीवी एकत्र येतात.

भिलवडी जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी बाहुबली सुदर्शन चौगुले यांची निवड झाली, तर सहेलीच्या अध्यक्षपदी उज्वला सुनील परीट यांची निवड झाली. यावेळी बाहुबली चौगुले म्हणाले, जायंट्स कुटुंब, गिरीश चितळे आणि समिती सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवीन. नेत्रदान, रक्तदान, आरोग्य शिबिरांसोबतच विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

सुनीता चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुबोध वाळवेकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!