महाराष्ट्रराजकीय

प्रिंटमीडिया आज ही विश्वासार्हता राखून आहे : दक्षीण’चे आमदार. ऋतूराज पाटील यांचे प्रतिपादन

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

: शहरासह जिल्ह्यात आजही घडणाऱ्या बातम्या सोशल मीडिया द्वारे एक मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचतात. मात्र ती बातमी दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात छापून आल्याशिवाय त्यावर आपला विश्वास बसत नाही. हीच खरी विश्वासार्हता प्रिंट मीडियाने आजही राखून ठेवली आहे. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ते करवीर पूर्व पत्रकार संघाच्या ७ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सध्या सोशल मीडियाचे जग आहे. मात्र त्यावर इतका विश्वास बसत नाही जितका वृत्तपत्रातील बातमीवर बसतो. म्हणूनच प्रिंट मीडिया हे विश्वास संपादन करणारे माध्यम आहे.असाही विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्व्हलस ग्रुपचे संग्राम पाटील , इनरव्हील क्लबच्या गीता कदम ,प्रा.डॉ.महादेव नरके, स्वरूप कदम हे प्रमुख उपस्थित होते.

चौकट.’सकाळ’ चा उल्लेख अन् बातमीदाराचा विशेष सत्कार.
कंदलगावचे सकाळचे बातमीदार प्रकाश पाटील यांच्या वर्षभरात लागलेल्या समाजहित व समस्येवर पडदा टाकणाऱ्या बातम्या असल्याने पत्रकार संघाच्या वतीने उदाहरण देत आम. ऋतूराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

आमदार ऋतुराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब पाटील, सुधाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष माने,सूत्रसंचालन डॉ. प्रवीण जाधव व आभार मदन अहिरे यांनी मानले.

अध्यक्ष मालोजी पाटील, उपाध्यक्ष सुरेश मसुटे,सचिव मदन अहिरे,प्रदीप पवार यांचेसह करवीर पूर्व पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!