बेडग गावाने सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली :- बेडग गावातील स्वागत कमान संदर्भात समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका. बेडगच्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, या घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी. प्रशासनामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
बेडग गावातील स्वागत कमान अनुषंगाने समाज माध्यमावर कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. दोन समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी गावकऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात समाज माध्यमातून चुकीचे संदेश देणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.