दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्ह्यातील स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली असून याबाबतचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी गावच्या ग्रामसभेमध्ये गावामध्ये स्मार्ट मीटर बसवू नये असे ग्रामसभेत ठराव करून वरिष्ठ पातळीवरती पाठवले आहेत.परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सदरचे ठराव रद्द करून केंद्र शासनाचा उपक्रम या गोंडस नावाखाली अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्यास संबंधित ग्रामपंचायतींना आदेश दिले आहेत व जे कोणी आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे सांगितलेले आहे .यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिलेला आदेश चुकीचा आहे,भारतातील ग्रामसभा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेतील ७३ वी घटनादुरुस्ती नंतर घटनात्मक दर्जा प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्रात ग्रामसभेचे अस्तित्व आणि अधिकार मुख्यतः महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार आहेत.भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३(अ) नुसार ग्रामसभेला मान्यता देण्यात आली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशामुळे ग्रामसभेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचे काम सदरचा आदेश करत आहे त्यामुळे आदेश तात्काळ रद्द करून मागे घ्यावे तसेच महावितरण ही व्यावसायिक कंपनी असून तिला स्वतःच्या फायद्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांचे मार्फत कोणतीही आदेश ग्रामपंचायतींना देण्याचा अधिकार नाही उपमुख्य कार्यकारी यांनी दिलेल्या आदेशामुळे ते जनतेचे सेवक आहेत की महावितरण कंपनीचे असा संशय सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले व सदरचा आदेश तात्काळ रद्द करणे विषयी सविस्तर चर्चा करून विनंती केली अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाची राहील असे सांगितले यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी दिलेले आदेश तात्काळ रद्द केले जातील असे सांगितले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे पक्षाचे अध्यक्ष विश्वास कोळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले बाबा सांद्रे जिल्हा संघटक मनोहर पाटील अभिजीत पाटील धन्यकुमार पाटील चंद्रकांत अडसूळ संजय कुलकुंबे भरत चौगुले बाळासो जाधव राजू माने उपस्थित होते.