महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीयसामाजिक

घरपट्टी- पाणीपट्टी हा महापालिकेचा आर्थिक कणा : महापौर धीरज सूर्यवंशी

६६ कोटींच्या विक्रमी वसुलीबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक; नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी आता दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ वेळ राखीव; महापौरांचे आदेश

 

 

दर्पण न्यूज मिरज/ सांगली-: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा सविस्तर आढावा आज मा. महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मा. उपमहापौर श्री. गजानन मगदूम आणि सभागृह नेते श्री. संदीप आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती.

६६ कोटींची वसुली: कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

चालू आर्थिक वर्षात आजअखेर ६६ कोटी रुपये इतकी घरपट्टी वसूल केल्याबद्दल महापौरांनी वसुली विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. “घरपट्टी आणि पाणीपट्टी हा महापालिकेचा आर्थिक कणा आहे. या उत्पन्नातूनच शहराचा विकास साधला जातो,” असे नमूद करत महापौरांनी कर्मचाऱ्यांना उर्वरित काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे आवाहन केले.

पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासक सहकार्य

वसुलीची उद्दिष्टे पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

शहराच्या विकासकामांसाठी कर भरणे आवश्यक असल्याने, नागरिकांनीही आपल्या थकीत कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी विशेष ‘तक्रार निवारण वेळ’
नागरिकांच्या करविषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी महापौरांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आता दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ ही वेळ केवळ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी राखीव असेल.

या निश्चित केलेल्या वेळेत संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशा कडक सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

बैठकीस उपस्थित अधिकारी:
या आढावा बैठकीस मनपा उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांच्यासह घरपट्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वसुली कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!