ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिलवडी येथे मराठा आरक्षणासाठी महिलांचा एल्गार

साखळी उपोषण : सरपंच विद्याताई पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांचा मोठा सहभाग

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे बीड जिल्ह्या त मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्यात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी रात्री कॅण्डल मोर्चा काढण्यात आला तसेच गुरुवारी महिलांनीही एल्गार पुकारून सकाळपासून साखळी उपोषण  सुरू केले आहे.

या साखळी उपोषणामध्ये भिलवडी गावच्या सरपंच विद्याताई सचिन पाटील यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्या व भिलवडी येथील विविध संघटनेवर पदाधिकाऱ्यांमधून काम करीत असलेल्या महिला पदाधिकारी, महिलांचा मोठा सहभाग आहे.

 

दरम्यान, भिलवडी येथे बुधवारी काढलेल्या कॅन्डल मोर्चामध्येही  मराठा समाजातील नागरिकांचा, महिलांचा मोठा सहभाग होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!