महाराष्ट्र

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया भरुन शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार

 

सांगली -: प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रूपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा केंद्र शासनाने खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवला आहे. तथापि सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनामार्फत शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतकऱ्यांवर न ठेवता, त्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. ही योजना राज्यात शासनाने खरीप हंगामामधील १४ पिके, रब्बी हंगामामधील ६ पिकांकरीता अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ/मंडळगट किंवा तालुकास्तरावर अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!