डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री : सिद्धरामय्याजी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी सत्कार, शेतकरी मेळाव्यास हजारोंची उपस्थिती ; माजी सहकार मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे नेटके नियोजन
सांगली ; डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हा देश चालला आहे नाहीतर या देशांमध्ये भाजप सरकारच्या मुळे गरिबांचे हाल झाले असते. देशाच्या राज्यघटनेमुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच मी आज कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री आहे असे स्पष्ट मत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी यांनी सांगली येथील सत्कार समारंभ आणि शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होतो. डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या टीमने मेळाव्याचे अतिशय नेटके नियोजन केले होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी म्हणाले की कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची जशी एक हाती सत्ता आली. तशी सत्ता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी गोरगरिबांचे हाल केले तै लोक कधीही विसरणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात या देशांमध्ये काँग्रेसचे सत्ता नक्कीच येईल नेहमीच काँग्रेस पक्षांनी सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे तसेच या देशाची राज्यघटना व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी आज कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री आहे. लोकांचा कसा विकास करता येईल याकडेच माझे लक्ष असणार आहे.
माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी जोरदार भाषण केले.
या मेळाव्या प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे एम बी पाटील ,विशाल पाटील, नाना पटोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रणिती शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. मेळाव्यास प्रामुख्याने कडेगाव पलूस मतदार संघातील लोकांचा मोठा सहभाग होता डॉक्टर विश्वजीत कदम यांनी मेळाव्यास जास्तीत जास्त कसे लोक येतील हे पाहिले होते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या मतदारसंघातील लोक आले होते. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या या मेळाव्यामध्ये अनेकांची उपस्थिती पाहून पुन्हा जोमाने काम करण्याची इच्छा काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.