महाराष्ट्र

सुपोषित किशोरी; सशक्त नारी हा संदेश सर्वदूर पोहोचणे गरजेचे: शिल्पा पाटील

पोषण महिन्याच्या निमित्ताने कागल पंचायत समिती, कोल्हापूर येथे आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न


महिला तसेच मुलींच्या पोषणासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे: श्री कुलदीप बोंगे , कागलचे गट विकास अधिकारी

कोल्‍हापूर, : 

 

पौष्टिक आहाराचे महत्व या बाबतीत जनजागृती करण्यासाठी सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातो. सुपोषित किशोरी; सशक्त नारी ही या वर्षीची संकल्पना मुलींच्या पोषणाचे महत्त्व अधोरेखित करते. सुपोषित मुलींच्या माध्यमातूनच उद्याची सशक्त पिढी निर्माण होऊ शकते होऊ शकते व यासाठी पौंडावस्थेतल्या मुलींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण तसेच आहारावर किशोरवयीन  मुलींनी लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यातून त्यांच्या शरीरावर दूरगामी सकारात्मक परिणाम होतील असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोल्हापूर श्रीमती शिल्पा पाटील म्हणाल्या. केंद्रीय संचार ब्यूरो आणि पंचायत समिती कागल  यांच्या संयुक्त विद्यमाने कागल  पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात पोषण माह तसेच भरड धान्यांचे महत्त्व या विषयावर आयोजित  मल्टी मिडिया प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

महिला तसेच मुलींच्या पोषणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे कागलचे गट विकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे यावेळी बोलताना म्हणाले.

सदर प्रदर्शनी मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन उपनिरीक्षक श्री. मारुती जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाशी संबंधित माहिती प्रदर्शित केली असून दृकश्राव्य  पद्धतीने देखील यावेळी माहिती दिली जाईल.

यावेळी डी आर माने महाविद्यालयाच्या डॉ. सरस्वती गायकवाड आणि श्रीमती पूजा बोतेकर यांनी अनुक्रमे भरडधान्य आणि रानभाज्या या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या  या प्रदर्शनामध्ये भरड धान्ये, पोषण माह या बाबतीत माहिती मांडण्यात आली आहे.

या प्रदर्शनीमध्ये इतर माहिती बरोबरच व्हर्चुअल रियालिटी गॉगल्स, 360 डिग्री सेल्फी बूथ आणि इतर डिजिटल माध्यमातून देखील माहिती प्रदान करण्यात येईल.  तीन दिवसांच्या या पोषणविषयक सोहळ्यामध्ये पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीला मोठय़ा प्रमाणावर भेट देऊन नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले. यावेळी कागल  पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारचा केंद्रीय संचार ब्यूरो विभाग विविध सरकारी योजनांवर प्रदर्शनी तसेच इतर प्रसिद्धी कार्यक्रमांचे आयोजन करत असतो.

पोषण माह, ज्याला राष्ट्रीय पोषण महिना म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे. सप्टेंबरमध्ये महिनाभर चालणारी मोहीम देशातील कुपोषणाच्या विशेषत: महिला आणि मुलांमधील महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.

वर्तणुकीतील सकारात्मक बदलांना प्रेरणा देण्यासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक जबाबदारीची भावना वाढवण्यात पोषण माह महत्त्वाची भूमिका बजावतो. समुदाय आणि व्यक्तींना एकत्र आणून हे अभियान  लोकांसाठी एक निरोगी आणि अधिक पोषणयुक्त भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे महेश चोपडे, प्रमोद खंडागळे आणि विलास शेणवी उपस्थित होते

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!