महाराष्ट्रराजकीयसामाजिक

सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती : जनसुराज्य पक्षात अनेकांचा प्रवेश

मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश ; प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांची उपस्थिती

दर्पण न्यूज मिरज  – : सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच, झाली असून मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यां सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यात आला.

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी सांगितले की तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौलापुर विमानतळ प्रश्न मार्गी लावणर आहे. तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असेही आश्वासन दिले.

सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्ष बांधणी सुरू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जन सुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे लक्ष समोर ठेऊन प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेऊन अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक,तसेच अजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा जोरदार पक्ष प्रवेश सुरू आहे आज
कौलापुर येथील काँग्रेस पक्षाचे मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौलापुर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन समित दादा कदम यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!