ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात लोकांनी सहभाग घ्यावा ; गटविकास अधिकारी राजेश कदम

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस -:  महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावांचा सक्रिय सहभाग होणे आवश्यक आहे , लोकांनी १७ रोजी च्या ग्रामसभेत सहभाग घ्यावा, अशी माहिती पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शासनाने या अभियानासाठी बक्षिसपात्र गावांना ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस तालुक्यासाठी स्वनिधीतून तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे गावांनी लोकचळवळ उभी करून, ग्रामपंचायत सक्षमीकरण व बळकटीकरण, वैयक्तिक लाभाच्या योजना सक्षमपणे राबविण्यात आल्या तसेच विकासकाम योजना राबवल्या तर एकूण ६ कोटी रुपयांचे भरघोस बक्षीस मिळू शकते. या अभियानाचा भाग म्हणून १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी केले.

या पत्रकार परिषदेला विस्ताराधिकारी दिनेश खाडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुधीर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!