दुधोंडी येथील महिलांनी केले कृष्णा कॅनॉल च्या पाण्याचे पूजन
लोकनेते जे के बापू जाधव यांच्या पाठपुराव्याला श
दूधोंडी ::सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दूधोंडी येथील शेतकऱ्यांना नवसंजीवन असणाऱ्या कृष्णा कॅनाल ला तीन ते चार महिन्यातून दुधोंडी येथे पाणी येताच कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मा जे के (बापू) जाधव यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ निर्मलाताई जाधव, अस्मिता सुधीर भैय्या जाधव, यांच्या शुभ हस्ते पाणी पूजन करुन ओटीभरण कॅनॉल मध्ये सोडण्यात आली.
गेली तीन ते चार महिने झाले कृष्णा नदीला पाणी असून ही नदी शेजारच्या गावाना दुष्काळसदृश्य परास्थिती निर्माण झाली आहे, दूधोंडी व दूधोंडी पंचक्रोशी येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वरदान असणाऱ्या कृष्णा कॅनॉलचे आवर्तन गेली अनेक दिवस बंद असल्याने येथील पाण्याच्या विहिरी व बोअर च्या पाण्याची पातळी कमी झाल्या होत्या, जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांनी, शेतकऱ्यांनी आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढल्याने अनेक दिवसांनी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने आज दूधोंडी या ठिकाणी पाणी आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी दूधोंडी गावातील महिलांनी कृष्णा कॅनॉल चे पाण्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, दूधोंडी ग्रामपंचायत सदस्या सौ सुप्रिया रानमाळे, सौ दुर्गा जाधव, सौ गौरी साठे, सौ रेखा जाधव, सौ लीला सकट, सौ अर्चना पाटील, सौ रेखा खराडे, सौ शकुंतला जाधव, सौ वैभवी साळुंखे, सौ संगिता चव्हाण, सौ शारदा साळुंखे, सौ रमाबाई साठे, सौ सिना जमदाडे, सौ मनाबाई जमदाडे, सौ रुपाली सकट, सौ शालन घोरपडे, सौ कविता जाधव, सौ आनंदी जाधव, सौ शबाना गवंडी, सौ आनंदीबाई आवळे, सागर जाधव, गणेश कोळी, शुभम चव्हाण, प्रदीप रानमाळे, हर्षद जाधव, सुदाम साठे, रघुनाथ साठे, शशिकांत साठे, आनंदा साठे, अक्षय साठे तसेच महिला वर्ग उपस्थित होत्या.