महाराष्ट्र
स्वामी रामानंद भारती विचारमंचचे कृतज्ञता पुरस्कार जाहीर
भिलवडी:-
बुरुंगवाडी ता. पलूस येथील स्वामी रामानंद भारती विचारमंचचे वतीने कृतज्ञता पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आले आहेत.माळवाडी येथील ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ.महादेव बसाप्पा कबाडे व ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक एम.पी.जाधव यांचा रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७ वा. ग्रामपंचायत कार्यालय बुरुंगवाडी समोरील मैदानात पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.नागठाणे ता.पलूस येथील प्रसिद्ध कथाकार हिंमत पाटील यांचा कथाकथन कार्यक्रम संपन्न होणार आहे.विचारमंचच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.विचारमंच चे अध्यक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव,सचिव विकास हवलदार यांनी पुरस्काराची घोषणा केली