“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उत्तुंग”
वांगी येथे मोदी @ 9 , पलूस कडेगांव विधानसभा क्षेत्रांमध्ये १४ कलमी कार्यक्रमांतर्गत पत्रकार परिसंवाद : भाजप पदाधिकारी उपस्थित
पलूस :- देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उत्तुंग आहे. मोदीजी यांनी सामान्य माणसाला विचार करून देशाचा विकास साधला. पुन्हा देशात भारतीय जनता पक्षाचे च सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. यासह सांगली जिल्हा ही भाजपमय होणार, अशा भावना भाजप पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या.
पलूस कडेगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख व संयोजक संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सेवा सुशासन आणि गरीब कल्याण मोदी @ नाईन २८५ पलूस कडेगांव विधानसभा क्षेत्रांमध्ये १४ कलमी कार्यक्रमांतर्गत पत्रकार परिसंवाद कार्यक्रम वांगी शिवणी रोड वांगी येथे झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थित पदाधिकारी व पत्रकार यांचे स्वागत केले.
मन की बात कार्यक्रम आणि पत्रकार वार्तालाप असा कार्यक्रम पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वांगी येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर (भाऊ) इनामदार, पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्राम (भाऊ) देशमुख, सांगली महापालिकेचे स्थाई समिति सभापती धीरज सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, ओ. बी. सी. मोर्चा प्रदेश चिटणीस प्रकाश गढळे, कडेगाव मंडल अध्यक्ष धनंजय देशमुख, पलूस मंडल अध्यक्ष विजय पाटील, पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील, पलूस तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमाअंतर्गत पत्रकार व भाजप चे जिल्हा पदाधिकारी यांच्या मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा प्रमुख पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा तसेच पलूस तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच भाजपामध्ये काम करताना थोडा वेळ लागेल परंतू चांगले काम करणाऱ्यांना योग्य ती संधी मिळतेच. यावेळी पृथ्वीराज देशमुख यांनी आम्ही उठसूट नुसते कामांचे नारळ फोडत नाही तर विविध विकास कामे कशी पुर्ण करता येतील यासाठी प्रयत्न करीत असतो.कोणत्याही कामांचा गवगवा करीत नाही.असा कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले की, जिल्हा परिषदेचा कार्यकाल उत्कृष्ट रित्या पुर्ण करुन विविध विकास कामांचा डोंगर उभा करणारे मितभाषी व्यक्तीमत्व म्हणजे संग्राम देशमुख..शिस्तबद्ध काम करण्यात संग्राम देशमुख यांचा हातखंडा आहे असे मत व्यक्त केले.तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी पृथ्वीराज बाबांची आहे.आजपर्यंत जिल्ह्यात अनेक मोठमोठे मंत्री झाले परंतू कमी मंत्री असताना जिल्ह्याचा विकास साधण्याचे काम भाजपने केले असल्याचे सांगितले.यावेळी पलूस व कडेगांव तालुक्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, भाजप पदाधिकारी यांनी परिसंवादात विरोधकांचे चांगलेच चिमटे घेतले.