“आप”चे डॉ. अमोल पवार यांचे प्रस्थापितांना तगडे आव्हान
विविध सामाजिक संस्था, संघटनांचा वाढता पाठिंबा, बॉण्ड पेपरवर लिहून दिला वचननामा

साांगली : डॉ.अमोल पवार पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पुणे मतदारसंघातील पुणे,सांगली,सोलापूर,कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलेल्या ‘पदवीधर संवाद यात्रेस ‘ विविध संस्था, संघटना, आणि मान्यवर पदवीधर मंडळींनी बिनशर्त आणि जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. डॉ अमोल पवार यांनी आपल्या व्हिजनचा वचन नामा बॉण्ड पेपरवर लिहून देऊन पदवीधर मतदारांशी बांधिलकी व्यक्त केली आहे.
आमदारकीच्या नात्याने पुणे पदवीधर मतदारसंघात कार्यक्षम, सुशिक्षित व नवा चेहरा लाभणार असल्याने परिसरातील युवक वर्गात चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय ,ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार माननीय निखिल वागळे यांनी आपला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून,”लोकशाहीच्या संवर्धनासाठी डॉ.अमोल पवार यांना निवडून देणे आवश्यक आहे. ते कृतिशील व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते असून अशी व्यक्ती विधान परिषदेवर जाणे आवश्यक आहे.”असे असे मत व्यक्त केले आहे.
“संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ.अमोल पवार याना माझा पाठिंबा आहे व सर्व पदवीधरांनी त्यांना मत द्यावे.”असे जाहीर आव्हान संविधान व मानवाधिकार विश्लेषक एड. असीम सरोदे यांनी केले.
सुप्रसिध्द अभिनेते मा.संदीप मेहता यांनी आपला व्हिडीओ देऊन ‘वोट फॉर वर्क’ चा नारा दिला. तसेच माजी सनदी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी “डॉ.अमोल पवार हे स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्व असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे.”असे विधान केले.. जलनायक संपतराव पवार यांनी सुध्दा डॉ अमोल पवार यांच्यासारख्या उमद्या व प्रामाणिक नेतृत्वाला निवडून देण्याचा आवाहन केले.
डॉ.अमोल पवार यांना तत्त्वज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय डॉ. ज. रा. दाभोळे सर यांनी पाठिंबारुपी आशीर्वाद दिले.
सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब कुलकर्णी, सांगली जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार ,माजी उपाध्यक्ष एड. सुरेश चव्हाण यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. तसेच येळावी गावी झालेल्या 20 तारखेच्या मेळाव्यात उपस्थित असलेल्या 200 पदवीधर गावकऱ्यांनी एकमुखी निर्धार करून डॉ. अमोल पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच आणि महामार्ग संघर्ष समिती या संघटनांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सन 2014 चे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार व अमृतवेल मासिकाचे संपादक श्री. धर्मेंद्र पवार यांनी, “राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी डॉ.अमोल पवार यांना पाठिंबा देत आहे”,असे सांगितले.
सातारा येथे 22 तारखेला झालेल्या आम आदमी पार्टीच्या जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्राचे राज्य संयोजक माननीय रंगा राचुरे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय संदीप देसाई यांच्या उपस्थितीत आपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल पवार यांचे जल्लोषात स्वागत केले व डॉक्टर जोरदार मतदान घेवून निवडून येणारच असा निर्धार व्यक्त केला.
डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर कराडच्या सर्व पदाधिकारी आणि संयोजक माननीय डॉ. संजय पुजारी यांनी “डॉ.अमोल पवार हे विज्ञानवादी विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे मी त्यांना पाठिंबा देत आहे.”असे सांगितले.
22 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झालेल्या आप’च्या संकल्प मेळाव्यात ‘आप’कोल्हापूरचे अध्यक्ष निलेश रेडकर आणि शहर अध्यक्ष उत्तम पाटील यांनी डॉ.अमोल पवार यांना या निवडणूकीत निवडून देण्याचा संकल्प केला. यादरम्यान
सोलापूर येथे झालेल्या 23 व 24 तारखेच्या संवाद यात्रेत पंढरपूर तसेच सोलापूर डॉक्टर असोसिएशन यांनी जाहीर पाठिंबा दिला.तसेच सोलापूर वकील संघटना यांनी हि जाहीर समर्थन दिलं.साडेचार हजार सभासद असलेल्या ‘उमेद’संस्थेने आपले प्रश्न डॉक्टर अमोल पवार नक्कीच सोडवातील हा विश्वास असल्यामुळे त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.दौर्याच्या दरम्यान झालेल्या भेटीगाठीत अनेक शिक्षक -पदवीधरांनी अमोल पवार यांना जाहीर समर्थन दिले.तसेच माढा तालुक्यातील युवकांचे जबरदस्त जाळे असलेले संघटन म्हणजे श्रीमंत राजे प्रतिष्ठान यांनी आपला पाठिंबा दिल असताना असे विधान केले की “डॉ.अमोल पवार यांच्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाकडे आम्ही आकर्षित होऊन त्यांच्यासोबत कार्यरत राहणार आहोत.”
डॉ.अमोल पवार यांना डॉक्टर असोसिएशन,सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत,पत्रकार वकील,कलाकारांनी आणि सामाजिक संघटनांनी जनसमर्थन देऊन, त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे.
-यंदा आपला माणूस-
*(व्होट फॉर वर्क)
असा नारा देत या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ अमोल पवार या सामाजिक चळवळीतील लढावू नेतृत्वाने प्रस्थापितांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.
पदवीधर मतदार प्रस्थापित कारखानदारांना धक्का देत डॉ अमोल पवार यांनाच निवडून देवून स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारणाला संधी देण्या च्या मानसिकतेत आहेत असे चित्र निर्माण झाले आहे.