महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार झाले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
Share